प्रारब्ध
*प्रारब्ध*
*******************
*केलेली कर्म ही केंव्हा ना केंव्हा भोगल्या शिवाय त्यातून सुटका नाही.*
*म्हणून उगाच असं झालं, तसं झालं ,असं करायला हवं होतं. मग असं झालं असतं. वगैरे, वगैरे सगळं विसरा.*
*कारण जे झालं ते तसंच होणार होतं. ते आपलंच पूर्वीच केलेल कर्म आहे.*
_____________________
*कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा, श्री कृष्णाने, वसुदेव- देवकीची कारागृहातून सुटका केली.*
*तेव्हा देवकी त्याला म्हणाली,_*
_*"हे कृष्णा!!*,_
*अरे तू स्वतः साक्षात्* *परमेश्वराचं रूप आहेस ना?.*
*तर मग तू कधीच कंसाचा वध करू शकत होतास...!*
*मग कंसाला मारून आमची त्याच्या कैदेतून सुटका करायला तू चौदा वर्ष॔ का थांबलास ?*
*यावर श्रीकृष्ण म्हणाले.*
*माते, गेल्या जन्मात तू मला चौदा वर्षे वनवासात कां बरं पाठवलं होतंस ?"*
*श्रीकृष्णांचं उत्तर ऐकून देवकीला धक्काच बसला.*
*देवकी म्हणाली मी?....*
*अरे मी कधी तुला चौदा वर्षं वनवासात पाठवलं होतं.... ?*_
*हे काय बोलतो आहेस तू.... ?*
*त्यावर कृष्ण भगवान म्हणाले,*_
*"माते ही घटना गतजन्मातली असल्यामुळे आता तुला त्यातलं काहीच आठवत नाही.*
*पण गेल्या जन्मात तू कैकयी होतीस...*
*आणि तूच मला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवलं होतंस.*
*हे ऐकून देवकीला धक्काच बसला,*
*आणि तिने आश्चर्याने विचारलं,कृष्णा*
*मी गेल्या जन्मातली कैकयी..? तर मग*
*त्या जन्मातली कौसल्या कोण...?*
*यावर श्रीकृष्ण हसून वदले,__*
*माता यशोदा म्हणजे गेल्या जन्मीची कौसल्या होय.*
*जिला गेल्या जन्मात, माझी आई असूनही चौदा वर्षं पुत्रप्रेमाला पारखं व्हावं लागलं होतं.*
*तेच प्रेम तिला माझी माता म्हणून या जन्मी लाभलं.....*
*आणि तुला पुत्र प्रेमाला पारख व्हावं लागलं.*
*"माते, प्रत्येकाला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांची फळं ही भोगावीच लागतात.....त्यातून देवांचीही सुटका होत नाही....!*
_________________
*विचार करा मग आपण कां वाईट वाटून घ्यावं.? जे आहे ते भोगूनच संपवणे हे योग्य. कारण सुटका नाही.*
*गत जन्माची पापे. ती येती भोगरुपे.*
*आणि भोग हे भोगूनच संपवावे लागतात.*
*******************
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
Comments
Post a Comment