Posts

Showing posts from November, 2025

शाळेचे खाजगीकरण,देशाचा विनाश अटळ

*शाळेचे खाजगीकरण; देशाचा विनाश अटळ!*  सदरील लेख पूर्ण वाचून आपल्या कडील सर्वच वाॅटसप गृपवर पाठवून जनजागृती करावी हि नम्रतेने आग्रहाची विनंती 🙏🙏🙏🙏                शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ मानली जाते. हत्ती मानवापेक्षा कितीही ताकदवान असला, घोडा किती चपळ व मजबूत असला आणि बैल भली मोठी बैलगाडी ओढत असला तरी यांच्या ताकदीपुढे मानवाची युक्ती श्रेष्ठ असल्यामुळे त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्याची (गुलाम बनविण्याची) किमया मानवाने साध्य केली आहे. *एखाद्या देशाला युध्द करुन पराजित करण्यापेक्षा डोके वापरून तेथील जनतेला फुकटच्या अन्नधान्याची सवय लावून आणि शिक्षणापासून वंचित ठेवल्यास त्या देशाला गुलामगिरीकडे नेता येऊ शकते.* सध्या भारताची आणि महाराष्ट्राची वाटचाल गुलामगिरीच्या दिशेने सुरु झाली आहे. सध्याचे सरकार हे जनतेचे सरकार नसून व्यापाऱ्यांचे सरकार आहे. *एकीकडे मराठा, धनगर आणि ओबीसींना आरक्षणाचे गाजर दाखवायचे आणि दुसरीकडे सरकारी नोकरी बंद करुन खाजगी ठेकेदारांकडून नोकर भरती करायची. तसेच UPSC विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरुन सचिव पदांच्या खाज...

दगडालाही चुकले नाही

*दगडालाही चुकले नाही...*     -डॉ.प्रतिभा जाधव -------------------------------------             क्षेत्र कोणतेही असो; ‘एकटे पाडणे, बहिष्कृत करणे, वाळीत टाकणे.’हे शब्द तुम्ही ऐकता तेव्हा त्याचे विशेष काही वाटत नाही परंतु जेव्हा ते अनुभवता तेव्हा त्याच्या वेदना किती त्रासदायक असतात? ते कळत अन जाळतही जाते. शक्यतो सुमार बुद्धीच्या वा ‘होयबा’वादी लोकांच्या वाट्याला हे ‘एकटे पाडणे’ येत नसते.  व्यक्तीत काही असामान्य कौशल्य गुणवत्ता, बुद्धिमत्ता असल्यास अनेकांन ते मोठ्या मनाने स्वीकारता येत नाही व अशा व्यक्तीस पाण्यात पाहणाऱ्यांचीच संख्या वाढू लागते. एखाद्याच्या कर्तुत्वाची रेष मोठी झाली की, सुमार बुद्धीचे लोक असुरक्षित होतात. जळजळ-मळमळ सुरु होते, स्वतःच्या अपयशाच्या दु:खाचे विरेचन करण्यासाठी मग समगुणी लोक एकत्र येत कंपू, टोळी तयार करून समोरच्याला नामोहरम करण्यासाठी विविध डाव रचतात. हे माग खेचणारे खेकडे आपल्यापेक्षा कित्येक पायऱ्या खाली असतात व पायरीप्रमाणेच वर्तन करत असतात.          बहुतांश कल्पक व प्रामाणिक लोक आपल्या क...

उद्योगाचे मॉडेल

 रोबो , एआय नोकऱ्या खात आहे. सध्या कम्प्युटर सायन्स मधल्या नोकऱ्या कमी होत आहेत. एआयमुळं डोक्याचं आणि रोबोटमुळं हाताचं काम जाईल.एआय ,रोबोटला सुटीची / रजेची गरज नाही. साडूचा जाग्रण - गोंधळ नाही. . . ..अगदी टॉयलेट ब्रेकसुद्धा नाही. 24x7 काम. 1835 पासून भारतात मेकॉले शिक्षणपद्धत सुरू झाली आणि कारकुनीची प्रथा आली. खरं तर त्याआधी माणसं नोकरीवगैरे जास्त करतच नव्हती. स्वतःचा छोटामोठा उद्योग व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होती. इंग्रजी अंमलानंतर नोकर बनण्याची मानसिकता अधिकाधिक बळावत गेली. नोकरीची सवय दीडशे दोनशे वर्षांत लागलीहे.  उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे समीकरण बदललं. आत्ता एका जागेसाठी दहादहा हजार अर्ज येतात. एवढ्या मोठ्या स्पर्धेत अनेकांना नोकरी  मिळणार नाही  हे तर उघड गुपितच! त्यामुळं उद्योग, व्यवसाय, व्यापार करावाच लागणार. खरंतर नोकरी मिळाली नाही म्हणून बिझनेस करणं ही प्रेरणाच चुकीची वाटते. नोकरीत स्वतःच्या आयुष्याचा रोडमॅप तयार करण्याचे स्वातंत्र्य नसते, उद्योग- व्यवसायात ते असते. नोकर म्हणून जगणं आणि पेन्शनर म्हणून मरणं हा मध्यमवर्गीय माइंडसेट सोडाव...

थकलीस का रे

“एका स्त्रीचा अपूर्ण श्वास” रात्रीचे अकरा वाजले होते. संपूर्ण घर झोपेत बुडालं होतं. फक्त स्वयंपाकघरातून येणारा मंदसा छन-छन आवाज त्या शांततेला भेदत होता. टेबलवर अर्धवट जेवलेले ताट ठेवलेलं होतं. भाजी थंड झाली होती, पोळी कडक झालेली, आणि अनाया त्या ताटाकडे बघत होती. तिच्या डोळ्यांत झोप नव्हती, फक्त थकवा आणि ओलसरपणा होता. दाराच्या पलीकडून कुणीतरी डोकावलं, पण तिला पाहणारा कोणीच नव्हता… --- पहाटे पाच वाजता घरातील सगळे अजूनही निजलेले, आणि अनाया झाडू हातात घेऊन स्वयंपाकघरात कामाला लागलेली. गॅसवर दूध ठेवलेलं, सासूबाईंसाठी चहा तयार होत होता, मुलांच्या डब्यासाठी आलू पराठे बनवले होते, आणि नवरा रोहनचा शर्ट प्रेस होत होता. “इतका उशीर का झाला ? माझा चहा थंड झाला!” सासूबाईंचा रोजचा ओरडा कानावर पडला. अनाया काहीच बोलली नाही. फक्त मान खाली घालून तिने पुन्हा चहा बनवला — जणू तिने आपल्या तोंडाला कुलूप लावलं होतं.  रोहन ऑफिसला जाताना फक्त एवढंच म्हणाला, “कपडे नीट ठेव, मीटिंग आहे, उशीर होतोय मला.” ना “निघतो” म्हटला, ना “काळजी घे.” फक्त चाव्या टेबलावर आपटल्या आणि निघून गेला. --- दुपारपर्यंत घर चमकत होतं, पण...